# *हुनर खोज संवाद यात्रा*
# *आसाम*
# *दिवस दुसरा:21 नोव्हेंबर.*
माणसं मेल्यानंतर स्वर्गात जाण्याची स्वप्ने पाहतात. भारतात सुद्धा काही असे स्वर्ग आहेत.म्हणून जिवंतपणी स्वर्ग पाहायचा असेल तर नॉर्थ इस्ट राज्यात एकदा यायलाच हवे.# *आसाम*
# *दिवस दुसरा:21 नोव्हेंबर.*
सकाळी सात वाजता आम्ही एका आदीवासी गावाकडे निघालो.या गावाकडे जाताना जे निसर्गाचे दर्शन होते.ते खूप विलोभनीय आहे.
संपूर्ण आसामाच हिरवाईने नटलेला आहे.इथं फक्त निसर्गाचाच शो आहे. त्यामुळे चुकूनसुद्धा झाडे नसलेला प्रदेश दिसणार नाही.आपल्या सारखा इथं ग्रामीण भाग असेल अशी कल्पनासुद्धा करू नये.गुवाहाटी शर जेवढे विकसित झाले तेवढा ग्रामीण भागातला विकास नाही.हे चित्र देशात सर्वत्र आहे, त्यामुळे हे काय विशेष नाही.
काही गोष्टी फक्त निरीक्षण करत करत दोन डोंगर ओलांडून त्या गावात आम्ही पोहोचलो.उलीकुंची या गावात शाळा, हायस्कूल ,लहान दवाखाना,लहान दुकाने,बऱ्यापैकी तेथील मनाने इतरांपेक्षा विकसित झालेले गाव आहे. कदाचित हे गाव पंचक्रोशीतील महत्त्वाचे गाव असेल.
येथील शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मदतीने काही पाड्यावर असणाऱ्या कारागिरांचा पत्ता मिळाला.सोबत मार्गदर्शक म्हणून स्थानिक आदिवासी सोबत होता.त्याच्या मदतीने प्रत्येकाच्या घरी जात राहिलो.पण लोक शेतात पहाटे चारच्या आसपास शेतात काम करण्यासाठी जात असल्याने घरी फक्त लहान मुलेच दिसत .
एका कारागिराच्या घरी जाताना आमचा खूप कस लागला कारण त्यांचे घर उंचावर होते त्यानिमित्ताने ट्रेकिंगचा अनुभव आला.
येथील शाळेत गेलेले आदिवासी लोक असमिया व स्थानिक बोलीभाषेनंतर इंग्रजी बोलतात.हे विशेष. मिशनरी शिक्षणाचा प्रभाव आहे ,हे यातून समजलं.प्रत्येक घरासमोरील स्वछता पाहून खूप मन प्रसन्न झाले.
भारतातील चांगल्या रस्त्यावर खड्डे आहेत.मग अशा दुर्मिळ भागातील परिस्थिती काय असू शकते,याचा विचार न केलेलाच बरा.
इथे 5 च्या दिवस मावळत असल्याने आदिवासी कारागीर लोकांची माहिती घेऊन गुवाहाटीकडे परतीचा प्रवास सुरु केला.
ऐल तटावर पैल तटावर
हिरवळी घेऊन
निळासावळा झरा
वाहतो बेटाबेटांतुन
चार घरांचे गाव चिमुकले
पैल टेकडीकडे
शेतमळयांची दाट लागली
हिरवी गर्दी पुढे (कर्मश:)
*© Saudagar kale.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा